मुंबई : दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील 14 गावातील ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजा, शेती आदींसाठी अडथळे येणार नाहीत, त्यांचे हक्क अबाधित राहतील यादृष्टीने वनविभागाने काळजी घ्यावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात या अनुषंगाने झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी हे निर्देश दिले.
दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रात 14 पैकी 3 गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. या गावातील गावकऱ्यांचे हक्क अबाधित रहावेत; त्यांच्या दैनंदिन कामाला अडथळे येऊ नयेत यासाठी विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश भरणे यांनी दिले.
अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाची रक्कम देणे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याबाबत तातडीने पावले उचलावित अशी मागणी श्री. आबीटकर यांनी केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश श्री. भरणे यांनी दिले. दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातून 14 गावे वगळण्याच्या अनुषंगानेही मागणी केली गोली आहे.