नवी दिल्ली – कोरोना संकटाशी सामना करत असताना आपल्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आज भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे काही उपाययोजनांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या या अर्थविषयक उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले असून रिझर्व्ह बँकेच्या या उपाययोजनांमुळे सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, शेतकरी व गोरगरिबांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
देशामध्ये सध्या लॉक डाऊनचा दुसरा टप्पा सुरु आहे. ३ मेरोजी संपत असलेल्या या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असून याबाबत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या दरम्यान चर्चा झाली होती. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या या चर्चेनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने आज काही उपाययोजनांची घोषणा केली आहे.
पंतप्रधानांचे ट्विट
पंतप्रधानांनी आरबीआयच्या उपाययोजनांचे आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून स्वागत करताना, ‘आरबीआयच्या उपाययोजनांमुळे पत पुरवठ्यामध्ये सुधारणा होईल. सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, शेतकरी व गोरगरिबांना याचा फायदा होईल. तसेच डब्लूएमए वाढवल्याने राज्यांना देखील लाभ मिळेल’