पिंपरी – छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. प्रत्येक व्यक्तीच्या धर्माचा मान, सन्मान राखणे हा काँग्रेसचा धर्म आहे. हिंदू, मुस्लिम या देशात एकजुटीने राहत आहेत, असे प्रतिपादन आमदार रवींद्र धंगेकर यांनी केले.
पिंपरी येथे आम आदमी (आप) पक्षाचे माजी शहराध्यक्ष अनुप शर्मा, उपाध्यक्ष महेश बिराजदार पाटील, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा माजी अध्यक्ष वहाब शेख तसेच विष्णू पाटील, दीपक श्रीवास्तव, सतीश नायर, सीमा यादव, मेमुना शेख, सद्दाम पठाण, रवी कृष्ण मोरे, जावेद शेख, भैय्यासाहेब कांबळे, गणेश कांबळे, मुकेश जाधव, अजय गायकवाड, फिलिप मकासरे, रामसिंग यादव आदींनी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत आमदार धंगेकर आणि अध्यक्ष डॉ. कदम यांनी केले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्ष शामला सोनवणे, युवक शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, माऊली मलशेट्टी, विठ्ठल शिंदे, उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, भरत वाल्हेकर, बाबा बनसोडे आदी उपस्थित होते.
डॉ. कैलास कदम म्हणाले, काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो. गेली ६५ वर्षे देशाचा विकास करीत सामान्यांना न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भाजपाकडे देशाच्या विकासाचा अजेंडा नाही. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेत काँग्रेसचा महापौर करायचा आहे. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस संघटना बांधण्याचे काम करीत आहे.