पुणे – बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. उर्वरित राज्यात मात्र पुढील तीन ते चार दिवस ऊन सावल्यांचा खेळात सरी कोसळणार आहेत. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारी छत्तीसगड भागात सक्रिय होते.त्यामुळे बुधवारी व गुरुवारी विदर्भात काही भागात चांगला पाऊस झाला; पण आता हे कमी दाबाचे क्षेत्र क्षीण झाले आहे. त्यामुळे जोर कमी होईल.
राज्यात उर्वरित भागातसुद्धा पावसाचा जोर पूर्णपणे ओसरला आहे. घाटमाथा वगळला अन्य ठिकाणी पाऊस ओसरला आहे. मध्य महाराष्ट्रात हलके ढग जमा झाले होते.