खडकवासला – खडकवासला धरणाच्या लगत असलेल्या वन विभागाच्या डोंगरावरती वन विभागाकडूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून डोंगरांचे लचके तोडत रस्ता बनवण्यात आलेले आहे .अशा पद्धतीने वनांची हानी करणे हे एक प्रकारे अन्यायकारक असून संबंधित अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मागणी आहे.
या ठिकाणी गेस्ट हाऊस च्या नावाखाली अनेक बंगले या ठिकाणी उभारले जात आहेत अतिशय मोक्याची असणारी ही जागा वनराईने नटलेली आहे पुण्यातील लाखो पर्यटक वीकेंड असल्यावर या भागांमध्ये फिरण्यासाठी येत असतात. परंतु अशा पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास करण्याचा विडा जर वन विभागाने उचलला असेल तर त्यांच्या वरती कारवाई ही झालीचं पाहिजे .वनांची रक्षण करण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे. तेच भक्षक बनले आहे.
सामान्य माणसाने झाडांची फांदी जरी तोडायची झाली. तरी नाना प्रकारच्या सरकारी परवानगी घ्याव्या लागतात परंतु या ठिकाणी अक्षरश झाडांची कत्तल करत डोंगर पोखरून काढण्यात आलेला आहे तरी याविषयी जिल्हा अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या कडून काम त्वरित थांबवणे व संबंधित अधिकार्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत लेखी स्वरूपात मागणी करणार आहे. त्यानंतर याच्यावरती कारवाई न झाल्यास या विरोधात मोठे आंदोलन उभे करण्याचा इशाराच मनसेने या ठिकाणी दिलेला आहे.
“अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला खडकवासला परिसरात वनविभागाने डोंगर फोडत केलेले रस्ते, बंगले, झाडांची कत्तल या सर्व गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी जिल्हाधिकारी यांनी केली पाहिजे व दोषी अधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल केले पाहिजे अन्यथा मनसे यावरती मोठे आंदोलन उभे करेल”, विजय मते अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ मनसे