नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या मित्रांना 50 वर्षांच्या कराराने विमानतळे देऊन त्यांना दौलतवीर करीत आहेत, पण देशातील युवकांना मात्र केवळ चार वर्षांची कंत्राटी नोकरी देऊन त्यांना अग्निवीर बनवले जात असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीची जी अग्निपथ योजना लागू करण्यात आली आहे, त्याच्या विरोधात कॉंग्रेसतर्फे देशभर टप्पाटप्याने आंदोलने सुरू आहेत त्या संबंधात राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात ही टीका करताना म्हटले आहे की, आज अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील कॉंग्रेस कार्यकर्ते सत्याग्रह करीत ्आहेत.
जो पर्यंत युवकांवरील अन्याय दूर होत नाही तोपर्यंत आमचा हा सत्त्याग्रह थांबणार नाही. आज कॉंग्रेसतर्फे देशाच्या विविध भागात शांततेत धरणे धरण्यात आले तसेच निदर्शनेही करण्यात आली.