विश्रांतवाडी (प्रतिनिधी) : करोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या कालावधीत एकत्र जमणे शक्य नसल्याने पूर्वनियोजित विवाह अवघ्या १० नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला .
विद्यानगर येथील ऐश्वर्या अनिल आल्हाट (वय २७ वर्षे) व धानोरी येथील आशीष जालिंदर कांबळे ( वय ३० वर्षे) या उच्चशिक्षित तरुण-तरुणीचा विवाह २६ एप्रिल २०२० रोजी धानोरी-लोहगाव रस्त्यावरील गीताई लाॅन्स येथे होणार होता.
परंतु करोना संसर्गाच्या काळात लाॅकडाऊनच्या परिस्थितीत हा विवाह घरातच करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला. त्यानुसार दोन्हीकडील ५ – ५ नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. इतर नातेवाईक व मित्र परिवार यांनी या नवपरिणीत वधुवरांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.