सोरतापवाडी (पुणे) – सप्टेंबर महिना सुरू होताच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला आहे. मागच्या तीन दिवसांपासून उरुळीकांचन परिसरात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.
ऐरवी गजबजलेली पुणे जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेली उरुळी कांचन बाजारपेठ दुपारच्या उकाड्याने एकदम ओस पडली आहे. कडक ऊन आणि घामाने नागरिक त्रस्त झाले आहेत. आकाशात नुसतेच ढग जमा होत असुन पाऊस मात्र हुलकावणी देत असल्याचे दिसून आले आहे.