नगर -जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येची दररोज होणारी वाढ कमी होण्याचे नावच घेत नाही. आजही तब्बल 405 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, आतापर्यंत करोनामुळे तब्बल 614 रुग्ण दगावले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
दरम्यान, आज जिल्ह्यात 877 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही समाधानकारक आहे. आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 32 हजार 448 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील हे प्रमाण 87.09 टक्के असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 405 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4197 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 93, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 40 आणि अँटिजेन चाचणीत 272 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 40, राहाता 1, नगर ग्रामीण 11, नेवासे 2, श्रीगोंदा 3, पारनेर 3, राहुरी 1, शेवगाव 14, कोपरगाव 6, जामखेड 9, कर्जत 1 आणि इतर जिल्हा 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 40 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 13, संगमनेर 7, राहाता 2, नगर ग्रामीण 4, श्रीरामपूर 2, श्रीगोंदा 1, पारनेर 3, अकोले 3, राहुरी 1, कोपरगाव 2 आणि कर्जत 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 272 जण बाधित आढळून आले. यामध्ये, संगमनेर 36, राहाता 40, पाथर्डी 26, नगर ग्रामीण 2, श्रीरामपूर 1, कॅन्टोन्मेंट 5, नेवासे 12, श्रीगोंदा 15, पारनेर 17, अकोले 18, राहुरी 13, शेवगाव 20, कोपरगाव 28, जामखेड 24 आणि कर्जत 15 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज 877 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 257, संगमनेर 39, राहाता 67, पाथर्डी 39,नगर ग्रा. 55, श्रीरामपूर 30, कॅन्टोन्मेंट 10, नेवासा 56, श्रीगोंदा 31, पारनेर 30, अकोले 50, राहुरी 68, शेवगाव 3, कोपरगाव 48, जामखेड 41, कर्जत 33र आणि मिलिटरी हॉस्पिटल 20 अशा रुग्णांचा समावेश आहे.