नगर – वाढते प्रदूषण आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्य या जागतिकस्तरपर्यंत गेल्या आहेत. औद्योगिकरण, वाहने, वाढती शहरे ही सध्याची भौतिक गरज असली तरी या वाढीबरोबरच झाडांची संख्याही वाढली पाहिजे. तेव्हाच प्रदुषणावर नियंत्रण मिळू शकू. यात प्रत्येकाचा सहभाग असणे हे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अहमदनगर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ वारी, स्वस्थ व निर्मल वारी’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अरविंद नागवडे, उपप्राचार्या डॉ.सय्यद रज्जाक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नगर केंद्र संचालक डॉ.नंदकुमार सोमवंशी, वाणिज्य विभाग प्रामुख डॉ.डी.बी.मोरे, रजिस्टार अरुण बळीद उपस्थित होते.
महाविद्यालयाच्यावतीने दरवर्षी कॉलेजच्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ वृक्षारोपणाने करण्यात येत असतो. महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर वृक्षांनी बहरलेला आहे. जेथे जेथे शक्य आहे तेथे-तेथे वृक्ष लावून त्यांचे संवर्धन केले जात आहे, प्रा.बार्नबस यांनी सांगितले.
यावेळी डॉ. सोमवंशी म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सामाजिकेतेची जाणिव करुन देण्यात येत असते. वृक्ष संवर्धन ही आजची व भविष्याची किती गरज आहे, हे विद्यार्थ्यांना कृतीतून पटवून देण्यात येते. यावेळी मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ.अभय शालीग्राम, डॉ.जी.एच. गायकवाड, प्रा.डॉ.भागवत परकाळ, प्रा.अशोक घोरपडे, प्रा.फरहान शेख उपस्थित होते.