नवी दिल्ली – कुशासनातून चांगला चाललेल्या देशाचा वाटोळे कसे करायचे याचे मोदी सरकारने जगात एकमेव उदाहरण घालून दिले आहे, अशा शब्दात कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
भारत हा एकेकाळी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक देश होता. त्या देशाचा नाश कसा करायचा याची आज भारत ही एक केस स्टडी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. वीज संकट, नोकऱ्यांचे संकट, शेतकरी संकट, महागाईचे संकट अशी सारी संकटे आज देशापुढे उभी आहेत.
पंतप्रधान मोदींचा 8 वर्षांचा चुकीचा कारभार हा एकेकाळी जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेली अर्थव्यवस्था कशी उद्ध्वस्त करायची याची एक केस स्टडी आहे, असेही राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे.