पळसदेव,(वार्ताहर) – सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पार्टीच्या वतीने प्रचार सुरू आहे. प्रचाराच्या या धांदलीत एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यामध्ये पूर्वीप्रमाणे वैचारिक विरोधाचे राजकारण व प्रचार राहिला नाही. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फुटल्याने पूर्वी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे लोकप्रतिनिधी सध्या विरोधी प्रचारसभात एकमेकांचे कट्टर वैरी आहेत, अशा पदतीने भाषणे करत आहेत.
या निवडणुक प्रचारात अनेकांनी एकमेकांवर कमिशनखोरी व जातीवादी, आरक्षण विरोधी असल्याचे आरोप केले यामुळे अनेक राजकीय नेते मंडळींची प्रतिमा मालिन झाली आहे. मी तुमचा विकास केला आस. मी तुमच्यासाठी काम करतो असं सांगणार्या नेत्यावरचा जनतेचा विश्वास कमी झाला आहे.
तुम्ही आमचा नाही तर तुमचं कमिशन वाढणायसाठी विकासकामे केली, असा आरोप आता जनतादेखील करायला लागली आहे. त्यामुळे आता जनतेला नेत्याचा विकास नाही तर कामातील कमिशनच अधिक दिसायला लागलं आहे. शिवाय अनेक ठिकाणी दमबाजी धमकीची भाषा अनेक नेत्यांनी प्रचार सभात केली. मतदान करा अन्यथा तुम्हाला पाणी मिळणार नाही.
तुमचा भाग वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या गावाला विकासाला निधी मिळणार नाही. तुमचा विकास थांबेल, तुमचा ऊस कोण नेणार आशय धमक्यांमुळे तर मतदार अधिकच भितरला असून धमकी देणार्या व कमिशन खोरीचे आरोप असलेल्या नेत्या विषयी जनतेच्या मनातील आदर कमी झाला आहे.
कोणाच्या विकासासाठी पक्ष बदलले
जनतेच्या विकासासाठी पक्ष बदलला असे ओरडून सांगणार्यां अनेक नेत्यांनी स्वतःच्या विकासासाठी पक्ष बदलला असल्याचं जनता पाहत आहे. त्यामुळे अनेक प्रचार सभांत नागरिकांची उपस्थिती कमी झाली आहे. बर्याच प्रचार सभांत एकच कार्यकर्ते पाहावयास मिळतात.
किंवा नेत्यांच्या मागे पुढे फिरणारी मलिदा गँग बहुतेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे जनतेने पुढार्यांना सोडून दिलं असल्याचं चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. या लोकसभा निवडणुकीत जनता एका बाजूला आणि नेते एका बाजूला आसलायचं चित्र इंदापूर तालुक्यासह इतर तालुक्यातही पाहावयास मिळत आहे.