कुडे येथील प्रचारसभेत अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांचा घणाघात
पाईट- खेड तालुक्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पण ऐन उन्हाळ्यात माझ्या माता भगिनींना वणवण करावी लागते. जनतेच्या हक्काचे पाणी पाळवणाऱ्या आजी-माजींच्या तोंडचे पाणी पाळवल्याशिवाय राहणार नाही, असा घणघणात अतुल देशमुख यांनी केला.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांची कुडे येथे सभा झाली. या सभेला पश्चिम भागातील जनतेने मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप मेदगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे तज्ज्ञ संचालक बाळासाहेब शिंदे, सतीश शिंदेज आडगावचे सरपंच प्रकाश गोपाळे, देवीदास जाधव, देवीदास बांदल, कोळीये गावचे सरपंच बारकू आवळे, शंकर धंद्रे, सरपंच शंकर गेंगजे, संतोष ममतू कावडे, गणेश जाधव, सुभाष मोहन, सुदाम शिंदे, लक्ष्मण शिंदे, नामदेव सावंत, बबिता पानमंद, विद्या तळपे, सुनीता चिमटे, परशुराम शिंदे भरत तरडे, म्हातारबा कुडेकर, जयश्री कुडेकर, उषा तळपे भागातील विविध सामाजिक संघटनांनी व महिला बचतगटांनी अतुल देशमुख यांना पाठिंबा दिला. पश्चिम भागातील गावागावांतील भांडण तंटे किंवा एकमेकांमधील वादविवाद विसरून मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतुल देशमुख म्हणाले की, आजी-माजी आमदार विकासाच्या नुसत्या गप्पा मारतात यांनी फक्त विकासाची आकडेमोड करीत बसले पण वास्तवात विकासाची मोडतोड केली या तालुक्यातील जनतेला मरगळलेला नाही तर उमद्या ताकदीचा आमदार पाहिजे या नेत्यांनी नेहमीच पश्चिम भागाची उपेक्षाच केली मुंबई भीमाशंकर रस्त्याबाबत या नेत्यांची उदासीनता दिसून येत असून पाच वर्षांपूर्वी निवडून आल्यानंतर भूमिपूजन केले होते आताही आचारसंहिते अगोदर भूमिपूजन केलं यांना फक्त भूमिपूजनच करता येते पण कामाच्या नावाने शिमगा खेड तालुक्यातील जनतेला मूर्ख बनवण्यात बहाद्दर पटाईत झाले आहेत पण जनता हुशार झाली असून यांना याना अस्मान दाखवल्याशिवाय या भागातील जनता स्वस्थ बसणार नाही.
- कधी नव्हे इतका पश्चिम भाग एकत्र येताना दिसत असल्याने हा भाग अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून पश्चिम भागातील एक शिक्की मतदान करून विधानसभेवर पाठवायचेच आहे, असा चंग बांधला आहे.
– काळुराम आतकर, ग्रामस्थ, येनिये - विरोधकांच्या पायाखालची माती सरकली असून त्यांचे आपल्या नेत्यांना फोन येणे सुरू असून धमक्या देणे सुरू झाले आहे; परंतु आम्ही या धमक्यांना घाबरत नाही. या नेत्यांची ठेकेदारी पार्टी असून ठेकेदार पोसणारी पार्टी आहे, अतिशय निकृष्ट पद्धतीचे काम करून मलई लाटण्याचा धंदा विरोधकांनी केलेला आहे, यांना एकएक काम करण्यासाठी पाच वर्षे पुरत नाहीत, अशा या कामचलाऊ नेत्यांना वेळीच घरी बसवून नव्या दमाच्या तरुणाला विधानसभेवर पाठवा.
– दिलीप मेदगे, सदस्य, जिल्हा नियोजन समिती