राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पूरस्थिती अजूनही कायम आहे. भीमा नदीवरील चास कमानधरणातून 12 हजार 690 क्युसेक तर भामा नदीवरील भामा असखेड धरणातून 18 हजार 527 क्युसेकने पाणी सुरू असल्याने भीमा नदी अजूनही धोक्याच्या पातळीत वाहत आहे
भीमा नदीवरीलचा कमान धरण क्षेत्रात सोमवारी (दि. 5) 63 तर आतापर्यंत 802 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भामा नदीवरील भामा असखेड धरण परिक्षेत्रात सोमवारी 92 तर आतापर्यंत 1267 मिलिमीटर इतका पाऊल पडला आहे. तालुक्यातीक अरळा नदीवरील कळमोडी धरणक्षेत्रात सोमवारी 113 तर आतापर्यंत 1380 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भामा आसखेड धरण
भामा आसखेड धरण परिसरात पर्जन्य प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातून भामा नदीला मध्यारात्री 1 वाजता 10 हजार 230 वरून 6 हजार 212 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. सकाळी 8.30.वा 10 हजार 527 वरून 15 हजार 527 क्युसेक वेगाने विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता 15 हजार 527 क्युसेकवरून 18 हजार 527 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला.
चासकमान धरण
सकाळी 08.30 वाजता 9 हजार 125 वरून 12 हजार 692 क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला. सकाळी 10.15 वाजता 12 हजार 692 वरून 17 हजार 950 क्सुसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. दुपारी 12 वाजता 17 हजार 950 वरून 21 हजार 350 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. पावसाचा जोर कमी झाल्याने रात्री 9. 30 वाजता विसर्ग 12 हजार 690 क्युसेक करण्यत आला.