नवी दिल्ली : गोरखपूर येथील डॉक्टर काफिल खान आणि उलेमा परिषदेचे सरचिटणीस ताहीर मंडी यांची तातडीने सुटका करावी मागणीसाठी उत्तर प्रदेश भवानवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
मंडी यांना यांना आझमगढ येथे पाच फेब्रुवारी सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तर काफील खान यांना अलीगढ मुस्लीम विद्यापीठात प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल 12 डिसेंबर रोजी अटक केली होती. या दोघांच्या सुटकेची मागणी करत विद्यार्थ्यांच्या गटाने मोर्चा काढला. त्यावेळी विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्याचवेळी उत्तर प्रदेश भवनजवळ विद्यार्थ्यांचा आणखी एक गट जमला. त्यांनी सुधारीत नागरिकत्व कायद्या विरोधात निदर्शने सुरू केली. त्यांनाही ताब्यात घेऊन जवळच्या पोलिस ठाण्यात नेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.
काफील खान यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यासारख्या कटोर कायद्यातील तरतुदींखालीअटक करण्यातआलीआहे. त्यांना मथुरा कारागृहात ठेवण्यात आले आहे.