वाघोली – वाघोली मधील गोरगरिबांच्या घरांचा प्रश्न आणि त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा या बाबत या एस. आर. ए ची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच निर्णय घेणार असल्याची माहिती रासपाचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर गोरे यांनी दिली आहे.याबाबत सागर गोरे यांनी सांगितले की वाघोली गावचा पुणे महानगरपालिका मध्ये समाविष्ट झाल्यामुळे बुरुंज आळी, वाघेश्वर नगर, सुयोग नगर, बजरंग नगर येथील गोरगरीब नागरिक राहतात.
जवळपास सोळाशे कुटुंब वाघोली भागांमध्ये राहत असून त्यांचे मूलभूत प्रश्न जसे की घर, रस्ता,पाणी, वीज असून वाघोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 8 अ चे उत्तरे देऊन नागरिकांचे घराचे प्रश्न मार्गी लावले होते. आत्ता शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अधिकारी यांनी नुकतीच पाहणी केली असून हा प्रकल्प या भागांमध्ये राबविला जाणार असून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून या रहिवाशांना कोणता लाभ मिळणार आहे व तो कोणत्या स्वरूपात मिळणार आहे याची संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर सदर नागरिकांबरोबर चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेणार असून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या योजनेमधून रहिवाशांना योग्य तो लाभ दिला नाही तर या प्रकल्पाला आमचा पूर्णपणे विरोध असेल व सदर प्रकल्प योजनेमधून रहिवाशांना योग्य लाभ मिळाला नाही तर सर्वसामान्य जनतेच्या मागणीसाठी व योग्य तो लाभ मिळावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रासपाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सागर गोरे यांनी दिला आहे.