दिल्ली : सुधारीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल देशातील अनेक भागात विद्यार्थी, विरोधीकानी आपला निषेध तीव्र केला आहे. हिंसक चकमकीप्रकरणी मंगळवारी पोलिसांनी २९ जणांना अटक केली.
सर्वोच्च न्यायालयाने हिंसाचाराची चौकशी करण्यासंदर्भात करण्यात आलेली याचिका नाकारली. तर दुसरीकडे, दिल्ली न्यायालयाने जामियात अटक केलेल्या 10 जणांना 31 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. जामिया मिलिया इस्लामिया हिंसाचारात भाग घेतल्याबद्दल पोलिसांनी सोमवारी त्यांना अटक केली. यापैकी एकही विद्यार्थी नाहीत.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. केजरीवाल म्हणाले कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही.
ईशान्य दिल्लीतील सीलमपूर भागात आंदोलकांनी अनेक मोटारसायकली पेटवून पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. यावेळी जमावाने पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे. तर पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीहल्ला केला.