नागपूर: गेले काही दिवस नागरिकता संशोधन विधेयकावर देशभर मोठा वाद सुरू आहे. देशभर ठिकठिकाणी नागरिक वेगेवेगळ्या प्रकारे या विधेयकाला विरोध करत आहेत. दिल्लीमध्ये यावरून काही विद्यापीठांत मोठा हिंसाचार झाला. हे विधेयक धार्मिकतेच्या आधारे नागरिकत्व प्रदान करणारे असल्याने संविधानाच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे. येणाऱ्या काळात न्यायालय यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरेल, सर्वोच्य न्यायालय संविधानाच्या मूलभूत तत्वांचे रक्षण करेल, अशी आशा बाळगण्याचे आवाहन अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आवारात झालेल्या हिंसक निदर्शना दरम्यान पोलिसांनी गोळीबार केला नाही, असे स्पष्टीकरणण गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. पोलिसांनी यावेळी निदर्शक विद्यार्थ्यांवर गोळीबार केल्यावा आरोप करण्यात येत आहे.
तसेच विद्यार्थी आंदोलनामध्ये काँग्रेसह शहरी नक्षलवाद्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. झारखंडमधील बरहैट येथे प्रचारसभेत ते बोलत होते. विरोधक नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन राजकारण करीत आहे. जनतेचे सरकार आहे. तुमचे मुद्दे आमच्यासमोर मांडा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू असेही मोदी म्हणाले.