नवी दिल्ली – इंटरनेटचा वापर हा मुलभूत अधिकार आहे असा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने आठवडाभरात तेथील निर्बंधांबाबत फेरविचार घेण्याचा जो आदेश दिला आहे त्याचे कॉंग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी स्वागत केले आहे. यावेळी कोर्टाने कोणताहीं दबाव मानला नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही या निर्णयाचे मनापासून स्वागत करतो.
या निर्बंधांच्या काळात जम्मू काश्मीरची जनता किती अडचण सहन करीत असेल यावर सर्वोच्च न्यायालयाने विचार केलेला दिसतो आहे. त्याबद्दल मी कोर्टाचे आभार मानतो. त्यांनी आज दिलेला निर्णय ऐतिहासिक आहे. संपुर्ण देशातील जनतेला अशा निर्णयाची प्रतिक्षा होती.
जम्मू काश्मीरातील जनतेला या निर्णयाचा निश्चीत लाभ व दिलासा मिळाला आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने काश्मीर बाबत संपुर्ण देशाची दिशाभुल केली आहे. पण यावेळी मात्र सर्वोच्च न्यायालय कोणत्याही दबावाखाली आले नाही ही स्वागतार्ह बाब आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.