नवी दिल्ली – खतांच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत येत्या दोन वर्षांत म्हणजे सन 2023 पर्यंत स्वयंपुर्ण होईल असा विश्वास केंद्रीय खत आणि रसायन खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांनी म्हटले आहे. देशात खत उत्पादनांसाठी चाळीस हजार कोटी रूपये खर्चून नवीन प्रकल्प उभारले जात आहेत. त्यातून ही स्वयंपुर्णता गाठली जाईल असे ते म्हणाले.
इफ्को कंपनीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका वेबीनार मध्ये ते बोलत होते. नॅनो फर्टिलायझर संकल्पनेला सरकार प्रोत्साहन देत आहे असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की आज देशात 42 ते 45 दशलक्ष टनांची खत निर्मीती होते. 18 दशलक्ष टन खतांची देशात आयात करावी लागते. देशातील युरिया निर्मीती प्रकल्पांच्या पुनरूज्जीवनाचे कामही मोठ्या प्रमाणावर हाती घेतले जात आहे असेही त्यांनी नमूद केले.