मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे खाजगी जीवन हा चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला आहे. कलाकार मंडळी मॉल-हॉटेल किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसल्यास प्रसारमाध्यमांत त्याची चर्चा चवीने रंगते. हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात ‘पापाराझी’ छायाचित्रकारांचा मोलाचा वाटा असतो.
समाजमाध्यमाचा वापर, नवीन तंत्रज्ञान, छायाचित्रकारांची वाढलेली संख्या, ‘पीआर’चा शिरकाव या कारणांमुळे बॉलीवूडमधील ‘पापाराझी’ संस्कृती लोप पावत चालली आहे. वांद्रे, जुहू,अंधेरी या भागात ऊन, पाऊस, वाऱ्याची तमा न बाळगता काढलेली कलाकारांची छायाचित्रे आणि त्या तुलनेत मिळणारे तुटपुंजे मानधन या आव्हानांना सामना करत ‘पापाराझी’ छायाचित्रकार छायाचित्रे काढत असतात.
दरम्यान, कलाकारांच्या नकळत त्यांची छायाचित्रे काढणाऱ्या छायाचित्रकारांना पापाराझी छायाचित्रकार असे म्हणतात. मात्र पापाराझींनीही सुट्टीची घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसचा धोका जगाबरोबरच देशातही वाढत आहे. भारतातील करोना बाधितांना संख्येने शंभरी ओलांडली आहे. यातच करोनाचा सर्वाधिक प्रभाव बॉलिवूडवरही पाहायला मिळत असल्यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. म्हणूनच ‘पापाराझींनीही सुट्टीची घोषणा केली आहे.