हिंगोली – बीडमधील घरे जळाली. त्याचा कुणी धिक्कार केला नाही. तिथे सर्वांनी जायला हवे होते. धीर द्यायला हवा होता. निषेध करायला हवा होता. पण, कुणी गेला नाही. मी गेलो तर म्हणे आग लावयला गेला.म्हणजे अश्रू पुसायलाही जायचे नाही का ? अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. हिंगोलीतील एल्गार सभेत भुजबळ बोलत होते. (Chhagan Bhujbal Hingoli Sabha)
आम्ही कसं जगायचे? एक दगड कधी मारला? एक टायर कधी जाळला का? गेले दोन महिने आमचे कुटुंब शिव्या ऐकते आहे. काय चाललंय? पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. फोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. (Obc hingoli sabha)
भुजबळ म्हातारे झालेत जरांगेच्या या टीकेला देखील भुजबळांनी जोरदार उत्तर दिल ते म्हणाले ,”हो! झालोय म्हातारा, सगळेच होणार आहेत. तुझे माता-पिता म्हातारे झाले असतील. तूसुद्धा म्हातारा होशील.” डोक्यावरचे केस पकडून भुजबळांनी यावेळी स्पष्टचं सांगितलं. (Obc Maratha Reservation)
“मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने पिकले नाहीत. माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी आंदोलनं मी केली आहेत. मी कधी जीवाची पर्वा केली नाही. आंदोलन माझ्यासाठी नवीन नाही असं देखील भुजबळांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
जरांगे पाटलांवर निशाणा
आम्ही कसं जगायचे? एक दगड कधी मारला? एक टायर कधी जाळला का? गेले दोन महिने आमचे कुटुंब शिव्या ऐकते आहे. काय चाललंय? पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. फोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी केलीय.