मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार सध्या अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदारांनी बंडखोरी केली असताना मनसेचे गजानन काळे यांचे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही) असे म्हणत त्यांनी ट्विट करून टीका केली आहे.
भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे.( विमानाचा खर्च परवडणार नाही)
नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे 😅
— Gajanan Kale (@MeGajananKale) June 29, 2022
काल एका जाहीरनाम्याद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदार आणि मंत्र्यांना भावनिक आवाहन केले ‘या समोर येऊन बोला आपण मार्ग काढू’ असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केले होते. त्यांरूनच गजानन काळे यांनी ठाकरे पिता पुत्रांवर ट्विट करीत निशाणा साधला आहे.
काय आहे ट्विट ?
“भावनिक साद घालण्यापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी आता थेट गुवाहाटी गाठावी आणि शिंदेंसह सर्व आमदारांना बैलगाडीतून परत घेवून यावे. ( विमानाचा खर्च परवडणार नाही) नाहीतर छोटे नवाब यांना पण शिंदे सेनेत सामील करून स्वतःचे मुख्यमंत्री पद नाही पण किमान छोटे नवाब यांचे मंत्रीपद तरी वाचवावे” असा टोला गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
पवारांचं स्वप्न पूर्ण झालं असेल
शिवाय गजानन काळे यांनी आणखी एक ट्विट केले आहे “आदरणीय पवार साहेब यांचं स्वप्न पूर्ण …शिवसेना संपली … ?” असे ट्विट गजानन काळे यांनी केले आहे. बंडखोर गटापैकी अनेकांनी आपल्या बंडाचा रोष हा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर व्यक्त केला होता. त्यानंतर मनसे कडूनही अशा पद्धतीने ट्विट करीत पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदरणीय पवार साहेब यांचं स्वप्न पूर्ण …
शिवसेना संपली … ?— Gajanan Kale (@MeGajananKale) June 22, 2022