पुणे – खडकवासला, पानशेत, वरसगाव ही तीन धरणे भरली असून आता टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. सध्या टेमघर धरण 96 टक्के भरले असून धरणात 3.56 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 28.98 टीएमसी म्हणजे 99.43 टक्के इतका आहे. खडकवासला धरणातून आजपर्यंत 10.80 टीएमसी इतक्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
शहराला या चार धरणांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या धरणातील पाणीसाठ्याकडे नागरिकांचे लक्ष असते. खडकवासला धरणात 1.96 टीएमसे म्हणजे 99.16 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर धरणातून 1 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पानशेत धरणात 10.65 टीएमसी म्हणजे 100 टक्के पाणीसाठा आहे. तर वरसगावमध्ये 12.82 टीएमसी म्हणजे 100 टक्के पाणीसाठा आहे.