बेंगळुरू – बीसीसीआयने दुखापतीतून सावरण्यासाठी तयारी करत असलेल्या तसेच सध्या खेळत असलेल्या खेळाडूंना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तंदुरुस्तीतून बाहेर आल्यावर संघात पुनरागमन करण्यापूर्वी खेळूंना यो-यो चाचणी बंधनकारक असते.
या चाचणीचे निकष इतके कठीण असतात की बहुतांशी खेळाडू त्यात नापास होतात. त्यातच ही चाचणी आणखी कठोर करण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होते. मात्र, आता त्याबाबत यू-टर्न घेण्यात आला असून ही चाचणी सौम्य केली जाणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.
यो-यो चाचणी ही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा निकष मानली जाते. जे खेळाडू ही चाचणी पास करणार नाहीत त्यांना संघात स्थान दिले जाणार नाही असे घोषित केले होते. मात्र, आता या निर्णयामुळे खेळाडूंना दिलासा मिळाला आहे.