कन्याकुमारी – सरकारी नोकरी मिळताच 32 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोइल येथे घडली आहे. आत्महत्येपूर्वी तरूणाने सुसाइड नोट लिहिली असून त्यात त्याने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे.
नवीन असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. नवीन हा खूप दिवसांपासून सरकारी नोकरीसाठी धडपडत होता मात्र त्याला सरकारी नोकरी मिळत नव्हती. अखेर त्याने देवाकडे नवस केला. जर सरकारी नोकरी मिळाली तर मी जीव देईन, तुमच्या आश्रयाला येईन असा नवस केला होता.
त्यानंतर नवीनला मुंबईत बॅंक ऑफ इंडियात नोकरी मिळाली. नोकरी जाॅईन करण्यासाठी तो मुंबईला आला. 15 दिवस नोकरीही केली. 15 दिवसानंतर नवीन त्रिवेंद्रमकडे निघाला आणि रेल्वे ट्रॅक वर झोपून त्याने आपला जीव दिला.
नवीन जवळ मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की, देवाला दिलेले वचन पूर्ण करत आहे. नोकरी मिळाली तर मी देवाच्या आश्रयाला जाईल असा नवस केला होता. त्यामुळे आत्महत्या करत आहे. असे सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. नवीन ने आत्महत्या करण्यामागे आणखी दुसरे काही कारण आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.