टीव्ही जगतात जर एखादा कॉमेडी शो असेल जो लोक खूप दिवसांपासून पाहत असतील तो शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोचे चाहते जगभरात आहेत. इतकेच नाही तर या शोमधील कलाकारांना लोक खूप प्रेम देतात. अशातच या शोमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधिल एक महत्त्वाचा अभिनेता 14 वर्षांनंतर या मालिकेचा लवकरच निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.
छोट्या पडद्यावरी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली 14 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ‘तारक मेहता’ मधील मुख्य अभिनेता शैलेश लोढा तब्बल 14 वर्षांनंतर ही मालिका सोडत असल्याची चर्चा आहे. त्यांनी या मालिकेचे शूटिंगही थांबवल्याची बातमी समोर आली आहे. या मालिकेच्या सेटवर ते पुन्हा येणार नसल्याचे बोलले जात आहे.
याआधी या मालिकेमधील दिशा वकानी, नेहा मेहता, गुरुचरण सिंह या कलाकारांनी काही दिवसांपूर्वी मालिकेचा निरोप घेतला होता. त्यानंतर आता शैलेश लोढा मालिका सोडून जाण्याची चर्चा आहे. या मालिकेच्या कॉन्ट्रॅक्टमुळे शैलेश नाराज आहेत. त्यांच्या मते त्यांच्या डेट्सचा वापर शोमध्ये निट केला जात नाहीये. या मालिकेमुळे शैलेश यांना इतर कामे करायला वेळ मिळत नाही. त्यांनी या मालिकेमुळे बऱ्याच ऑफर्स नाकारल्या. सध्या मालिकेचे निर्माते हे शैलेश यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.