Supriya Sule : राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्या दरम्यान, अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्यासाठी वेगेवेगळे मुद्दे समोर आणले जात आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याचे सर्वाना स्पष्ट झाले. त्यानंतर देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक तुमच्यासह कसे? असा आरोप विरोधकांकडून करण्यात येऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.याच पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या(शरद पवार) खासदार यांनी सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांनी, “भाजपने नवाब मलिक यांच्यावर जे आरोप केले ते चुकीचे आहेत. नवाब मलिक यांनी ड्रग्ज माफियांविरुद्ध नेहमीच लढा दिला. भाजप ‘भ्रष्ट ‘जुमला पार्टी’ बनली आहे. नवाब मलिक त्याचा पर्दाफाश करत राहिले… एखादी व्यक्ती दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष असते मग भाजप खोटे आरोप कसे करू शकते? मला पूर्ण विश्वास आहे की न्यायालय न्याय करेल आणि नवाब मलिकला न्याय मिळेल. आम्ही त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत. ” असे म्हणत आपण नवाब मालिकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधारी बाकांवर बसल्याने त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला असल्याचे सर्वाना स्पष्ट झाले. त्यानंतर देशद्रोहाचे आरोप असलेले नवाब मलिक तुमच्यासह कसे? असा आरोप विरोधकांकडून करण्यात येऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप आहेत. सत्तेपेक्षा देश मोठा आहे त्यामुळे त्यांना महायुतीत घेऊ नका” असे म्हटले आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने डिवचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून मलिकांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही, असे सांगितले. त्यामुळे अजित पवार यांची चांगलीच गोची झाल्याचे दिसून येत आहे.