पुणे – लहान वयात हेल्मेटचे महत्त्व समजले तर मुले आपल्या पालकांनाही घराबाहेर पडताना हेल्मेट घालण्याची आठवण करून देतील. त्यातून आपोआप घरोघरी जनजागृती होईल. त्यासाठी शाळांचे योगदान महत्वाचे असून, त्यामुळे रस्ते सुरक्षित आणि प्रवास सुरक्षित होईल, अशी भावना माजी उपमाहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केली.
राज्याच्या परिवहन विभागाकडून संपूर्ण राज्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंगस्कूलच्या विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य जितेंद्र पाटील होते. इंडियन हेड इन्जुरी फौंडेशन कार्यकारी संचालक रणबीर तलवार, समन्वयक गीता ठाकूर, सेफ इंडिया ओरिसा अध्यक्ष दिलीप कुमार पांडा, प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, युवा नेते अमित बागुल, शाळेच्या प्रिन्सिपल रुपाली कदम व वाईस प्रिन्सिपल अश्विनी ताठे उपस्थित होते.
जितेंद्र पाटील म्हणाले, मुंबईच्या तुलनेत अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे दगवानार्यांची संख्या पुणे शहरात जास्त आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. यामुळे शहरात विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे. पुणेकरांनी स्वयंपूर्तीने हेल्मेटचा वापर करण्याचे आव्हान त्यांनी केले. यावेळी पालक व विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे उपयोग, फायदे व मोटार वाहन कायद्यामधील तरतुदी याचे मागदर्शन रस्ता सुरक्षा अभ्यासक व निवृत्त अधिकारी अनिल पंतोजी यांनी केले. हेल्मेट वाटप प्रयोजन राजू घाटोळे यांनी केले.
प्रास्ताविक जामुवंत मसलकर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला विलास आपटे, निलेश गांगुर्डे, सुरज देवकर, ओमकार जाधव, गणेश बाजारे, पंढरीनाथ बुरघाटे, अनुज शिंदे, रुपाली बोरकर संतोष बोरकर, निलेश रेणुसे, मनोज कोंडेकर, अमेंय आपटे, भरत गायकवाड मोटार ड्रायविंग स्कूल ओनर असो महाराष्ट्र राज्य चे संचालक उपस्थित होते. मोटर वाहन निरीक्षक रेहमा मुल्ला यांनी रस्ता सुरक्षा विषयक प्रतिज्ञा पालक व विद्यार्थ्यांना दिले. सूत्रसंचालन शाहीद जमादार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप दुरगुडे यांनी केले.