राजगुरुनगर: हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात दररोज विद्यार्थ्यांच्या गटागटाने भांडणे होत असून टोळी युद्ध होण्याचे भीती निर्माण झाली आहे.पोलीस ठाण्याजवळच असलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची भाईगिरीचा पोलिसांनी समाचार घेतला होता मात्र यात वाढ होत चालली आहे.
कॉलेजच्या आवारात काही महाविद्यालयलयीन युवक बॅगमध्ये कोयता, लोंखडी गज, पाईप आणून त्याचा वापर हाणामाऱ्या करण्यात करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या टोळ्यांचा बिमोड करण्यासाठी खेड पोलिसांनी पुढची भूमिका घेतली असून चौकाचौकात या भाईंना पकडून उठाबशा व त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.