मुंबई – केंद्र सरकारकडून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निधी बंद करण्यात आला आहे. या यंत्रणेच्या कामासाठी केंद्र सरकारकडून 60 टक्के आणि राज्य सरकारचा 40 टक्के अशा निधीच्या तरतूदीतून ही यंत्रणा सुरू होती. पण केंद्राने आपला 60 टक्के वाटा देणे बंद केल्याने राज्य सरकारपुढे अडचणी निर्माण झाली होती. परंतु तरीही राज्य सरकारने ही योजना सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे.
आता राज्य सरकारतर्फे यासाठी शंभर टक्के निधी उपलब्ध करून ही योजना सुरू ठेवली जाईल अशी माहिती ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मिशन महाग्राम या अभियानात हे काम आता नव्याने हाती घेतले जाणार असून 2022 ते 2025 या अवधीत ही योजना राबवण्यास नुकत्याच झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.