मुंबई – भारतामध्ये महागाई वाढणार आहे. त्याचबरोबर विकास दर कमी होणार असल्याचे संकेत बऱ्याच पतमानांकन संस्थानी दिले आहेत. त्यातच जागतिक बाजारातील नकारात्मक संदेशमुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकात मोठी घट झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 485 अंकांनी म्हणजे शून्य 0,92 टक्क्यांनी कोसळून 52,568 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 151 अंकांनी कमी होऊन 15,727 अंकांवर बंद झाला.
मुख्य निर्देशांकांबरोबरच स्माल कॅप या छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित निर्देशांकांची बरीच हाणी झाली. विश्लेषकांनी सगितले की, पाच नकारात्मक गोष्टीच्या परिणामामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांक कमी झाले.
जागतिक बाजारात घसरण
चीन सरकारने बऱ्याच इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांवर नियम भंग केल्याबद्दल कारवाई केल्यामुळे आशियायी निर्देशांक सकाळी कमी झाले. त्याचबरोबर अमेरिकेची रिझर्व्ह बॅंक रोखे खरेदी लवकरच कमी करणारा असल्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली. या कारणा मुळे भारतीय शेअर बाजारातही विक्री झाली.
युरोपियन रिझर्व्ह बॅंकेची बैठक
युरोपीयन रिझर्व्ह बॅंकेची बैठक आठ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत आगामी काळात व्याज दर किती पातळीवर ठेवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेप्रमाणे युरोपियन बॅंक ही भांडवल सुलभता कमी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला.
वाढणारे करोना रुग्न
भारताबरोबरच काही देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे वृत्त येत आहे. त्यामध्ये जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपारोपातील काही देशांचा समावेश आहे. त्यामुळे गुंवणूकदार सावध झाले आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर होत आहे.
अमेरिका रोखे खरेदी थांबविणार
करानेच्या काळात भांडवल सुलभतेसाठी अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह सरकारी रोखे खरेदी करीत होते. मात्र आता परिस्थिती पूर्ववत होण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस फेडरल रिझर्व्ह रोखे खरेदी करणे थांबविण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर होत आहे. त्यात भारताचाही समावेश आहे.
अर्थव्यवस्थेचे नकारात्मक चित्र
भारताचा विकास दर या वर्षी दहा टक्क्यापेक्षा जास्त होईल असे म्हटले जात होते. मात्र निर्बंधांमुळे पहिल्या तिमाहीच्या उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारताचा विकास दर दहा टक्क्यांपेक्षा कमी होईल असे फिट्च या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे. याचाही परिणाम गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर झाला.