मुंबई – गेल्या आठवड्यात इराणने -इस्रायलवर हल्ला केल्यानंतर शेअर बाजाराचे निर्देशांक वेगाने कमी होत आहेत. गेल्या तीन कामकाजाच्या दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तब्बल 2,094 अंकांनी म्हणजे 2.79 टक्क्याने कोसळला आहे.
यामुळे या तीन दिवसात शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य 7.93 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 393 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. (Share Market: Iran’s attack on Israel has a major impact on the stock market; 7.93 lakh crore loss to investors in 3 days)
विशेष म्हणजे गेल्या पंधरवड्यात भारतीय कंपन्यांचे बाजार मूल्य 400 लाख कोटी रुपयावर गेले होते. मात्र त्यानंतर अमेरिकेत महागाई वाढल्याचे आकडेवारी जाहीर झाली. अशा परिस्थितीत परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारात विक्री करीत आहेत.
हा प्रश्न संपत नाही तोपर्यंत इराण- इस्त्रायल दरम्यान प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेअर बाजारात एकतर्फी विक्री चालू आहे आणि ती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळेही काही गुंतवणूकदार आवश्यकतेपेक्षा जास्त सावध राहून व्यवहार करण्याची गरज असल्याचे समजले जाते.