शिरगाव, (वार्ताहर) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्राम परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात शेतकऱ्यांना शेती विषयी येणाऱ्या अडचणी जाणून घेत आहे. मावळ तालुक्यातील ऊर्से, आढे, ओझर्डे, सडवली व बऊर या गावातून ट्रॅक्टरचे पूजन करून अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, सूर्यकांत सोरटे, सुभाष धामणकर, बाळासाहेब गाडे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात भाजपने केलेली विकासकामे व प्रधानमंत्री किसान योजना या विषयी स्थानिक नेत्यांनी माहिती दिली. शासनाच्या सर्व योजनांचा शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे व त्यापासून कोणी वंचित राहणार नाही, यासाठी तालुक्यात सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, असे विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे यांनी सांगितले. पाच गावांतील शेतकऱ्यांना पत्रके वाटप केली.
विजेचे थकीत बिले माफ करावे, अशी मागणी शेतकरी रोहिदास धामणकर यांनी केली. आढे येथील गुलाब घारे यांनी मोकाट गुरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. तसेच तालुक्यातील अनेक गावांत इनामी देवाचे जमिनी आहेत. गेली अनेक चार- पाच पिढ्या हे शेतकरी जमिनी कसत आहे. पण त्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजना लागू नाही तरी ती मिळावी, आदी तक्रारी ग्रामपरिक्रमा अभिप्रायात शेतकऱ्यांनी मांडल्या