शिवशंकर निरगुडे
हिंगोली – दरवर्षी मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पाऊस पडतो हे पाहून शेतकऱ्यांनी मे महिन्यातच पेरणीपूर्व मशागत करून ठेवली. परंतु, मृग नक्षत्रात पाऊसच पडला नाही. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे. तरीही काही शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरणी केली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने मे महिन्यात वर्तविला होता. परंतु, हवामान विभागाचा अंदाज मात्र ‘अंदाज’च ठरला आहे.
खरे पाहिले तर शेतकरीवर्ग पूर्वापार नक्षत्रांवरच पेरणी करत आला. आहे. त्यामुळे तो हवामान विभागाच्या अंदाजाकडे फारसे लक्ष देत नाही, असे पाहायला मिळत आहे. गतवर्षी मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला. याहीवर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी लगबगीने मे महिन्यात शेती मशागतीची कामे पूर्ण करून टाकली. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आर्द्रा नक्षत्राच्या ‘मेंढा’कडे लागले होते. या नक्षत्रात रिमझिम प्रमाणात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आर्द्रानक्षत्र संपायला सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. या नक्षत्रातील रिमझिम पावसावरच काही शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली आहे. काही शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या दुसऱ्या मान्सून दाखल होतो. परंतु, यावर्षी जून आठवड्यात संपला तरी पाऊस झाला नाही. काही तालुक्यांमध्ये तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला.पण आजमितीस संपूर्ण जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, खरिपाच्या पेरणीसाठी बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पेरणीसाठी हवा तसा पाऊस झाला झाला नसल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणी रखडली आहे. यावर्षी संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. संपूर्ण जून महिन्यात तालुक्यात केवळ 4 ते 5 टक्के पेरण्या झाल्या आहेत साखरा मंडळातील 17ते 18 टक्के पेरण्या झाल्या आहेत . येत्या 6 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्र सुरू होत. असून, याचे वाहन ‘गाढव आहे.
सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा साखरा केलसुला घोरदरी या भागातील काही शेतकऱ्यांनी रीमझीम पावसावर पेरणी केली आहें मात्र आत्ता पर्यन्त पुन्हा पावसाने हूलकावनि दिल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहें सर्व शेतकऱ्यांचे डोळे आभाळकडे लागले आहेत काही शेतकऱ्यांनि अगदी कमी ओलीवर पेरणी केली आहें त्यामुळे त्याना आत्ता पासून पिकांना वाचण्यासाठी पाणी देण्याची वेळ आली आहें
सेनगाव तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आजहि निसर्गाच्या पाण्यावर कोरडवाहू शेती करतात निसर्गाचे पाणी हेच शेतीचे जिवनामृत आहें परंतु आज निसर्गाच्या लहरीपनामुळे शेती करणे देखील मोठे अवघड झाले आहे.
मोठा पाऊस पडला तरच पेरणी करावी हवामान विभागाच्या अंदाजेकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. किमान जमिनीमध्ये 90 ते 100 मि.मी पावसाची नोंद झाल्यानंतर BBF पद्धतीने बीजप्रक्रिया करुणच पेरणी करावी. त्या पेक्षा कमी पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी करू नये कमी पावसावर पेरणी केली तर बियाण्याची उगवन होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते, असे सेनगावचे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे म्हणाले.