नवी दिल्ली – सरकारने घेतलेले काही निर्णय आता चुकीचे वाटू शकतात. मात्र येत्या काळात हेच निर्णय राष्ट्रबांधणीच्या दृष्टीने योग्य आणि मोलाचे ठरतील अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून बराच गदारोळ सुरू आहे. विरोधी पक्ष सरकारवर तुटुन पडले आहेत, तर काही राज्यांमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांकडून हिंसक आंदोलने केली जात आहेत.
त्या पार्श्वभूमीवर बंगळुरू येथे एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अनेक निर्णय आताच्या काळात म्हणजे वर्तमानात कोणाला चुकीचे वाटू शकतील. मात्र आगामी काळात राष्ट्रबांधणीच्या कामात त्यांची मदत होईल. हे बोलताना त्यांनी अग्निपथचा उल्लेख करणे मात्र टाळले.