लाहोर – पाकिस्तानने बेकायदेशीरपणे सागरी हद्दीत प्रवेश केलेल्या 20 भारतीय मच्छीमारांची सुटका केली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ते येथील तुरुंगात शिक्षा भोगत होते. त्यांना कराचीच्या लांधी भागातील मलीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
तुरुंग अधीक्षक मुहम्मद इर्शाद यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या आदेशानुसार भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली आहे. गेली पाच वर्षे ते तुरुंगात होते. आज, त्यांना एधी ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यांना पोलिसांच्या संरक्षणाखाली लाहोरला नेण्याची जबाबदारी आहे.
दरम्यान, या भारतीय मच्छिमारांना जून 2018मध्ये सागरी सुरक्षा दलाने अटक केली होती. यानंतर पाकिस्तानच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याबद्दल गुन्हा दाखल करत तुरुंगात टाकले होते.