मुंबई – भाजपातून राष्ट्र्वादीत गेलेले एकनाथ खडसे यांनी वेदांता प्रकरणावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारचा दबाव नसल्याने उद्योग स्थलांतरित होत असल्याचा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला आहे. जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधताना खडसेंनी वेदांता प्रकल्पाबाबत भाष्य केलं आहे.
वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. प्रकल्प महाराष्ट्रातून हलवल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी याबाबत भाष्य करत सरकारवर टीका केली होती. उद्योग धद्यांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप करत खडसेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होतात ही दुर्दैवी बाबा असलयाचे देखील खडसे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले खडसे नेमकं यावेळी
कोणतही सरकार असलं तरी इथला उद्योग स्थलांतरित होता काम नये. गुजरातचा नाहीतर कर्नाटक असो आंध्र असो इथला उद्योग दुसरीकडे जाता काम नये याची काळजी घेतली पाहिजे. दुदैवाने आपल्या समाजात उद्योग स्थलांतरित झाल्यानंतर प्रतिक्रिया फार कमी उमटतात. शासनाचा दबाव नसल्यामुळे असे उद्योग स्थलांतरित होत असल्याचे स्पष्ट मत खडसेंनी यावेळी व्यक्त केले.