नागपूर – मराठा आंदोलनात एकूण ५४८ खटले दाखल झाले. त्यातील ३२४ मागे घेण्यात आले. १७५ खटले पोलिस महासंचालकांच्या स्तरावर आहे. न्यायालयात २८६ खटले मागे घेण्यात आले आहे. नुकसानभरपाई न दिल्याने १० खटले प्रलंबित आहे. ४७ खटले कुठल्याही निकषात न बसल्यामुळे त्यात कारवाई झालेली नाही अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवरील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात बोलताना दिली.
यावेळी फडणवीस यांनी विरोधी पक्षांनी या संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही, अशी खंत व्यक्त केली. विजय वडेट्टीवार विराेधी पक्षनेते आहे. नाना पटोले विदर्भवादी आहे. विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असे उद्धव ठाकरे बाहेर बोलले. पण ठाकरे गटाला विधानसभेत विदर्भाचा विसर पडला. विदर्भामध्ये विदर्भाचा सपशेल विसर पडला हे चिंताजनक आहे असा टोला फडणवीस यांनी हाणला.
ड्रग्जच्या २४ हजार आरोपींवर कारवाई
ड्रग्जच्या संदर्भात २४ हजारहून अधिक आरोपींवर कारवाई केली आहे. २०२० मध्ये ५३२१ आरोपींवर कारवाई झाली. तर अडीच वर्षात १३१२५ आरोपींवर कारवाई झाली.
१९७६ नंतर पहिल्यांदा या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला. डिजिटायझेशनमुळे सायबर क्राइम हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्या दृष्टीने काम केले जात आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.