Mumbai Indians : भारतीय क्रिकेट संघ आणि मुंबई इंडियन्सचा सर्वात खास गोलंदाज जसप्रीत बुमराहने आज, मंगळवारी, 28 नोव्हेंबर रोजी सकाळी त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि त्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली. जसप्रीत बुमराहच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये असे लिहिले आहे की, कधी-कधी शांत राहणे हे सर्वोत्तम उत्तर आहे. बुमराहची ही इंस्टाग्राम स्टोरी पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आणि सर्व क्रिकेट चाहत्यांना तर्क-वितर्क (अंदाज) लावण्यास सुरू केले आहे की, बुमराह कशाबद्दल गप्प आहे.
जसप्रीत बुमराहला काय झाले?
जसप्रीत बुमराह सहसा सोशल मीडियापासून दूर राहतो, परंतु यावेळी त्याने एक टीकात्मक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे, ज्याने विचार करण्यास भाग पाडले आहे की, बुमराह नक्की कशाबद्दल गप्प आहे? बुमराहने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कोणत्याही मुद्द्याबद्दल काहीही सांगितले नसले तरी, त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे हे निश्चित आहे, ज्यावर तो गप्प बसून प्रतिक्रिया देत आहे.
Jasprit Bumrah’s Instagram story. pic.twitter.com/EgpAirzwai
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 28, 2023
मात्र, सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांनी बुमराह याविषयी काय मौन बाळगले आहे, असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. काही चाहते म्हणतात की, मुंबई इंडियन्स संघात काहीतरी गडबड सुरू आहे. रोहितनंतर कर्णधारपदासाठी बुमराह हाच मुख्य पर्याय होता, मात्र आता अचानक हार्दिक मध्यभागी आला आहे. या कारणामुळे बुमराह संतापला आहे. काही लोक म्हणतात की ,मुंबई इंडियन्सचे कुटुंब आता एकत्र राहिलेले नाही, ते विभागले गेले आहे.
संधी हुकल्याने बुमराहही नाराज…?
हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात दाखल झाल्यावर आपल्या कर्णधारपदाची संधी हुकल्यामुळे जसप्रीत बुमराह नाराज झाल्याचे सांगण्यात येत आहे. रोहितने संघाचे नेतृत्व सोडले तर त्याची जबाबदारी बुमराहकडेच सोपवली जाणार होती, असे संकेत मिळत होते. मात्र, आता बुमराहनेच सोशल मीडिया हॅंडलवर एक पोस्ट केली असून, यापुढे काही वेळा शांत राहणेच उत्तम असा संदेश पोस्ट केला आहे. त्यामुळे पंड्या मुंबई संघात दाखल झाल्यामुळे त्याची कर्णधारपदाची संधी हुकल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलची ट्रेडिंग विंडो येत्या 12 डीसेंबरपर्यंत खुली राहणार असल्यामुळे येत्या काळात आणखी एक नाट्यमय घटना घडू शकते व चक्क बुमराह देखील अन्य कोणत्या संघाचा भाग बनलेला दिसल्यास नवल वाटणार नाही.
मात्र, जसप्रीत बुमराहने यंदाच्या आशिया चषकापूर्वी दीर्घ दुखापतीनंतर पुनरागमन केले. पुनरागमन केल्यानंतर बुमराहने स्वत:ची एक नवीन आणि चमकदार बाजू दाखवली आहे. त्याच्या गोलंदाजीत पूर्वीपेक्षा अधिक धारदारपणा दिसून येत आहे. विश्वचषकातही जसप्रीत बुमराह हा भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारा चौथा आणि सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज होता. त्याने 11 सामन्यात 18.65 च्या सरासरीने आणि 4.06 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने एकूण 20 बळी घेतले.