पवन मावळ – पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायम स्वरुपी रद्द कराव, या मागणीकरिता मावळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने पवनानगर बाजार पेठेत शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच येळसे येथील शहीद स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलनानंतर हा प्रकल्प व कायम स्वरुपी रद्द करावा या साठी अप्पर तहसीलदार अजित दिवटे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला मावळ तालुका राष्ट्रीय कॉंग्रेस (आय), जमीन हक्क कृती समिती व मावळ धरणग्रस्त कृती समिती यांनी पाठिंबा दिला.
यावेळी अमित कुंभार म्हणाले की, सत्तेत असून भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आंदोलन करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. ही योजना कायमस्वरुपी रद्द करा. आम्ही हा आदेश दिला नसल्याचे राज्यकर्ते सांगत आहेत. मग तुम्ही आदेश दिले नाही, तर त्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा. जर आठ दिवसात जर हा निर्णय आला नाही तर शिवसेना शिवसेनेच्या स्टाईलने आंदोलन करेल, असा इशारा यावेळी दिला.
युवा सेनाप्रमुख विजय तिकोणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मावळच्या जनतेला कमी समजत असतील आणि तुमचे लक्ष पिंपरी चिंचवडकडे असेल, मात्र तुम्ही जर ही स्थगिती उठविली नाही तर जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवेल.
यावेळी तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, उपजिल्हा प्रमुख सुरेश गायकवाड, संघटक अमित कुंभार, विभाग प्रमुख उमेश दहिभाते, उप तालुका प्रमुख युवराज सुतार, मदन शेडगे, अनिल भालेराव, सुरेश गुप्ता, मावळ तालुका युवा सेना प्रमुख विजय तिकोणे, शांताराम भोते, भारत भोते, बाळासाहेब फाटक, अनिल ओव्हाळ, सतीश इंगवले, चंद्रकांत भोते, राम सावंत, सोमनाथ कोंडे, उत्तम तरस, रमेश जाधव, शैला खंडागळे, सागर वारुळे, मारुती खोले, बाळासाहेब शेलार, सचिन नाटक, शंकर दळवी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदा अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.