औरंगाबाद : राज्यात भाजप सरकार असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपने औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी महानगरपालिकेत केली होती. या मागणीवरून शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर ढोंगीपणाचा आरोप केला आहे.
1995 साली औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी औरंगाबाद महानगरपालिकेत केली होती. तासा प्रस्ताव सेनेने औरंगाबाद महापालिकेत मंजूर केला होता . या प्रस्तावाला काँग्रेसने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी वारंवार शिवसेनेने केली होती असा आरोप दानवे यांनी केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही ही मागणी आम्ही उपस्थित केली पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा दानवे यांनी केला.