Sharad Pawar on pm । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी पुण्यात एका जाहीर सभेत बोलत असताना मंचावर शरद पवारांचे बोट धरून मी राजकारण शिकलो, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा आता खुद्द शरद पवारांनीच समाचार घेतलाय. पंतप्रधानांच्या विधानाची आठवण करून देत आपण असलं काम करू दिल नसतं असं म्हटलंय. बारामतीतील शेतकरी-कामगार मेळाव्यात बोलत असताना शरद पवार यांनी पंतप्रधानांवर भाष्य केले.
माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही Sharad Pawar on pm ।
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले की, पंतप्रधान मोदी साहेब बोलतात खूप. एकदा तर त्यांनी सांगितलं की, शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो. पण आज त्यांचे जे काही राजकारण सुरू आहे. ते माझ्या विचारांनी नाही. माझं बोट धरल्यावर मी असलं काम करू देणार नाही. मोदी सरकारने आखलेली धोरणे हिताची नाहीत. व्यापाऱ्यांची मी नियोजित केलेली बैठक याआधी महाराष्ट्रात कधीही रद्द झाली नव्हती. मात्र यावेळी ती रद्द झाली, कारण एकप्रकारचा दबाव टाकला जात आहे. दबावानं समाजकारण, राजकारण करता येत नाही.” असे त्यांनी म्हटले.
आमच्याकडे होलसेलमध्ये चोरी झाली Sharad Pawar on pm ।
“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर लावून जनतेकडून १०० रुपये वसूल करतात आणि मग त्यातलेच सहा रुपये आपल्या खिशात टाकून म्हणतात मी तुम्हाला पैसे दिले. ही आहे मोदी गॅरंटी. जिथे सामान्य लोकांचे हित नाही, तिथे बदल पाहिजे. बदल पाहिजे असेल तर लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. म्हणून निवडणूकीत बटण दाबलं पाहिजे. आता यावेळेची खूण ही वेगळी आहे. घड्याळ्याची खूण ही तुम्हाला पाठ होती. आमचा पक्ष, घड्याळ, झेंडा सगळ्याचीच चोरी झाली. बाकी किरकोळ काही नाही, होलसेल चोरी झाली. सगळेच्या सगळे सोडून गेले. आता आम्ही नवा पक्ष, नवी खूण, नवा झेंडा, पण तोच जुना कार्यक्रम घेऊन पुढे आलेलो आहोत”, असेही शरद पवार म्हणाले.