शाहरुख खानच्या जवळ सध्या अगदी ऐषोआरामाच्या सुविधा आहेत, पण तरी खूप संघर्षाचा काळ बघितला आहे. त्या काळातही त्याने धीर न सोडता आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले होते. आज यशस्वी स्टार झाल्यावर देखील तो आपल्या त्या बॅड पॅचला विसरला नाही. ते कष्टाचे दिवस अजूनही त्याच्या चांगले स्मरणात आहेत.
एका टीव्ही शो मध्ये त्याने आपल्या या जुन्या दिवसांच्या काही आठवणी सांगितल्या. त्याला एकेकाळी 50 रुपये पगार मिळत असे. त्यादिवसात त्याला अचानक ताज महाल बघण्याची इच्छा झाली. तो ताजमहाल बघायला गेला, पण येण्या जाणासाठीच त्याच्या जवळचे सगळे पैसे खर्च झाले. जे पैसे वाचले होते, त्यात त्याला केवळ लस्सी घेता आली. मात्र, त्या लस्सीमध्ये माशी पडली होती.
ती लस्सी फेकून देण्याचे शाहरुखच्या जीवावर आले. त्याने माशी काढून फेकून दिली आणि ती लस्सी गटागट पिऊन टाकली. प्रवासादरम्यान त्याला याचा अचानक त्रास सुरू झाला. संपूर्ण प्रवासात त्याला उलट्या व्हायला लागल्या होत्या. अर्थात त्यामुळेच त्याला आपल्यावर गुदरलेला हा प्रसंग आयुष्यभर लक्षात राहिला.