आॅकलंड : आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. या मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त असलेल्या भारतीय संघाला न्यूझीलंडकडून कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.
मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यास आॅकलंड येथील ईडन पार्क मैदानावर थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याने क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केले आहे.
Captain @imVkohli wins the toss and elects to bowl first in the 1st T20I against New Zealand. pic.twitter.com/6NEIvq83w0
— BCCI (@BCCI) January 24, 2020
दरम्यान, सध्या टी-२० च्या क्रमवारीत भारत पाचव्या तर न्यूझीलंड सहाव्या स्थानी आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत ११ टी-२० सामने झाले असून यात ८ वेळा न्यूझीलंडने तर ३ वेळा भारताने विजय मिळविला आहे.