नवी दिल्ली: दिदेशातील सात आर्थिकदृष्ट्या गरीब राज्यांना करोनाचा सर्वाधिक धोका असल्याची बाब एका सार्वजनिक संस्थेने आपल्या अहवालातून निदर्शनाला आणली आहे. या राज्यांमध्ये बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात या राज्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या राज्यांशी संलग्न असलेल्या राजस्तान, आणि महाराष्ट्रांच्या काहीं जिल्ह्यांनाही करोनाचा मोठा धोका आहे असेही या अहवालात म्हटले आहे.
करोनाचे रूग्ण बराच काळ अनडिटेक्टेड राहिल्याने हा करोना प्रसाराचा धोका या राज्यात अधिक आहे असे हा अहवाल सांगतो.
उत्तर कर्नाटक, पूर्व महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, आणि तामिळनाडूच्या पूर्व भागातील जिल्ह्यांना मध्यमस्वरूपाच्या धोक्याची शक्यता आहे. केरळ, हिमाचल प्रदेश, हरियाना, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील बऱ्याच राज्यांना हा धोका बऱ्याच अंशी कमी राहील असेही यात नमूद करण्यात आले आहे.
करोना प्रसाराच्या धोक्याचा लोकसंख्या, पर्यावरणीय स्थिती, याचा अभ्यास करून केला आहे. कमी शिक्षण आणि कमी उत्पन्न गटातील लोकांनाही करोनाचा धोका अधिक असल्याची बाब जागतिक पातळीवरील संशोधनातून निष्पन्न झाली आहे. त्यासाठी त्यांनी करोनाचा धोका सर्वात कोठे अधिक उद्भवू शकतो त्याचे पंधरा निकष निश्चित केले आहेत. वातावरणाच्या स्थितीतील निकषात त्या भागातील तापमान आणि आद्रतेचेही काहीं निकष आहेत. त्याचा अभ्यास करून हे भाग निश्चित करण्यात आले आहेत.