वरुण धवन आणि नताशा दलाल हे बॉलिवूडमधील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांना एकत्रितपणे अनेकवेळा पार्टी आणि इव्हेंटमध्ये स्पॉट करण्यात आलेले आहे.
View this post on Instagram
मात्र, या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपबाबत कधीही खुलेपणाने सांगितले नाही. पण याबाबत नताशाने काही दिवसांपूर्वी खुलासा केला होता.
View this post on Instagram
वरुण आणि नताशने या वर्षाच्या शेवटी म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत लग्न करणार होते अशी चर्चा सोशल मीडियावर होती. मात्र कोरोनामुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यातच आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांनी गुपचूप साखरपुडा उरकला असल्याची चर्चा सुरु आहे.
दोघांकडून यावर आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण आलेले नसले तरी करिनासह बोलताना वरुणने नकळत नताशाला तिची मंगेतर म्हटले. मंगेतर हा शब्द ऐकताच करिनाला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या दोघांचा साखरपुडा हा चाहत्यांप्रमाणेच सेलिब्रेटींसाठीही धक्काच असणार आहे. यावरून हे स्पष्ट झाले की वरुणने नताशाबरोबर गुपचूप साखरपुडा केला आहे. करिनानेही वरुणला लग्नाविषयी प्रश्न विचारला होता.
View this post on Instagram
गेल्या कित्येक दिवसांपासून या बॉलीवूड कॅपल्स चर्चेत असून एका मॅगजीनसाठी दिलेल्या मुलाखतीत नताशाने सांगितले होते की, आम्ही दोघेजण एकमेकांना शाळेपासूनच ओळखतो. तेव्हापासूनच आमच्यात मैत्री असून आम्ही एकमेकांना डेट करत आहे. याबाबत दोघांनाही माहिती असून आमच्या एक वेगळेच नाते असून आम्ही चांगले मित्र आहे. यापुढेही रिलेशनशिप कायम राहणार असून आम्ही लग्नाचा विचार करत आहोत. मात्र, ऐवढात ते शक्य नाही, असेही नताशाने स्पष्ट केले.
View this post on Instagram
दरम्यान, वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास वरुण आपल्या आगामी “कूली नंबर १’चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. “कूली नंबर १’मध्ये वरुण- साराचा रोमांस पाहण्यासाठी प्रेक्षकांना मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे.