कुडाळ -शिक्षकांकडून भावी पिढी घडविण्याचे कार्य होते. आजच्या कोविडच्या कठीण काळातही त्यांच्याकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य घडत आहे.तालुका प्रशासनानेही या काळात उत्तम कामगिरी केली असून यामध्ये शिक्षण विभागाचे मोलाचे योगदान आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य वसंतराव मानकुमरे यांनी व्यक्त केले.
मेढा येथे जावळी शिक्षक समितीच्यावतीने आयोजित गटविकासअधिकाऱ्यांचा सन्मान व नूतन गटशिक्षणाधिकाऱ्यांचे स्वागत या संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष सुरेश चिकणे, पतसंस्था चेअरमन धीरेश गोळे, पतसंस्था व्हाइस चेअरमन रंजना सपकाळ, कार्याध्यक्ष विजय बांदल, सरचिटणीस तानाजी आगुंडे, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा वाडकर, सरचिटणीस स्वाती बारटक्के, माजी अध्यक्ष विनायक चोरट, गजानन वारागडे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिर्के, सुनील शिंदे, सुधाकर दुंदळे, विजय जुनघरे, शंकर दळवी, शांताराम ओंबळे,
समीर आगलावे, नथुराम पोफळे, मदन बोराटे, आप्पासाहेब निकम, विक्रम लकडे, अतुल बोराटे, सीमा बोराटे, मंगल पिसाळ, अश्विनी बोराटे, विजय सपकाळ, नितीन मोहिते, शामराव जुनघरे, ज्ञानप्रकाश फाऊंडेशनचे सदस्य व समितीचे सदस्य उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी श्रीमती अरुणा यादव म्हणाल्या, “जावळी शिक्षक समितीच्यावतीने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. कोविड काळात सर्वांनाच संघर्ष करावा लागला. जावळीच्या शिक्षण विभागाला आदर्श अधिकारी लाभले आहेत. चांगली शैक्षणिक परंपरा निर्माण झाली आहे. हा शिक्षणाचा वारसा यापुढेही यशस्वीपणे सुरू राहून यात निश्चितच भर पडेल.’
यावेळी आदर्श शिक्षक शामराव जुनगरे, विनायक चोरट, धीरेश गोळे यांची भाषणे झाली. नितीन मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी आगुंडे यांनी आभार मानले.