सातारा – महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याबाबतचा निर्णय घेतला गेला. त्यामुळे तरुणांच्या आशांवर पाणी फिरवण्याचे जे कृत्य त्या सरकारने केले, त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नेतृत्वाखाली आज साताऱ्यातील पोवई नाक्यावर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार, उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसने राज्यातील जनतेची माफी मागावी, अन्यथा सातारा जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही श्री. कदम यांनी दिला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, नगरसेवक धनंजय जांभळे, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, उपाध्यक्ष नितीन कदम, चिटणीस सुनील जाधव,तालुकाध्यक्ष गणेश पालखे, हेमंत शिंदे, अमोल कांबळे, शैलेंद्र कांबळे,
विकास बनकर, विक्रम बोराटे, रवींद्र आपटे, भीमराव लोखंडे,रणजित फाळके, चेतन घाडगे, सुनील भोसले, राज सोनवले, सुनील शिंदे, अविनाश खर्शिकर, महेश निकम, युवराज मोरकर, दामिनी सपकाळ, हेमांगी जोशी, वनिता पवार, नजमा बागवान, मनिष पांडे, प्रिया नाईक, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष रीना भणगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागितली नाही तर आणखीन मोठे आंदोलन उभारू आणि या नेत्यांना सातारा जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही असा संदेशही यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिला.