सातारा – जगभरात अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सातारा जिल्ह्यातही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या वीस दिवसांत परदेशातून सातारा जिल्ह्यात सुमारे पाचशेहून अधिक नागरिक आले असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील काही नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून 4 जण बाधित आढळले आहेत.
फलटण येथील पाच जणांचे नमुने जेन्युम सिक्वेसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते त्यातील तिघांचा रिपोर्ट ओमायक्रॉन बाधित आला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
करोना नियंत्रणात आला असतानाच नव्याने आलेल्या ओमायक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. दि. 28 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत विविध देशातून सातारा जिल्ह्यात पाचशेहून अधिक नागरिक आले असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची करोना चाचणी करण्यात आली असून त्यातील चार जण बाधित आढळले आहेत. फलटण येथील पाच जणांचे नमुने जेन्युम सिक्वेसिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. त्यातील तिघांचा रिपोर्ट ओमायक्रॉन बाधित आला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
तिघे ओमायक्रॉन बाधित आढळले असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी केले आहे.